Sunday, July 12, 2009

My ealry Birds

आज कविता करावी फार ईछा झाली,
का? कुणाची आठवण आली?

आठवण तर नाही आली,
मग मनाने का अशी चुक केली.

मग पाहिले पाऊस वारा तर नाही आला,
पण त्यानी पण आज पोपट केला.

मग काय आज माझा एकटे पणा बाहेर आला,
पण आजु बाजूच्या लोकानी तो अंदाज ही चुकवला.

लिहायला शब्द शोधू पहिले,
काय माहीत का ते माझ्यावर रूसले.

पण मग उमजले कविता करायला कारण का लागते,
मनातल्या भावना ना फक्त वाट हवी असते.

आज कविता करावी फार ईछा झाली,
बघू कशी जमली...

- कवी सर्वेश

Dedicated to My office....

नाही संपत त्याला काम म्हणतात

त्याच वाइड स्क्रीन वर डोळे ताणून बसायचे,

कधी उठून प्रिंटर कडे जायचे,

कधी ईमेल तरी कधी क्वचित ऑर्कुट चेक करायचे,

बाजूला मित्र पण याच अवस्थेत असतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


मस्त गरम चहा आणि ब्रेकफास्ट चा आइटम टेस्टी असणार,

असे स्वप्न सगळे पाहणार,

खांद्यावर तोच डबा घेऊन येणारा माणूस माझा हिरेमोड करणार,

माहीत नाही लोक कसे हसत हसत खातात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


पुन्हा मित्र फ्लॉप पिकनिक चे प्लान करणार,

आणि ऐन वेळेस कोणी तरी टांग मारणार,

माधेच बॉस ने डोकावले की हात माउस कडे सरसावणार,

रोज नवीन टार्गेट मिळणार...पण प्लान्स कधीच वेगळे नसतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


असेंब्ली ओपन होताना कॉंपोनेंट फेल होणार,

सापडत नाही म्हणून लोकाना घाम फुटणार,

दर वेळेस सगळे नवीन कॅट नंबर बुक करणार,

पण सर्वर चा कचरा कधी साफ करणार,

कधी मधेच येणारे मित्रांचे मेल्स थंड झुळुक बनून येतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


रिव्यू मीटिंग मधे बॉस कमरे वर हात ठेवून येणार,

त्याना माहीत असलेला तोच स्टेटस विचारणार,

एक मेकान कडे बघून सगळे मान डोलावणार,

एक संपत नाही तोच नेक्स्ट ऑर्डर ची हिंट देऊन बॉस गेलेले असतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!


रात्र रात्र जगून टार्गेट कम्प्लिट केले,

दुसऱ्या दिवशी मात्र चेहरया वर दुखी भाव ही नाही दाखवले,

बहुतेक जाताना टेस्टी नाश्ता आणि ऑटो यानी काम केले,

पण रोज थांबावायला एवढे चोचले ही पुरेसे नसतात,

नाही संपत त्याला काम म्हणतात !!

मन


मन कधी सुसाट वारा, जशा वादळी लाटा,
मन कधी आभाळा एवढे विशाल, जशा उंच पर्वत रंगा !!

मन कधी गुरांचा कळप, जसे पावसातले मळभ,
मन कधी हरवलेल्या वाटा, जशा पाटी वरच्या रेघोट्या !!

मन कधी फुलांचा कळ्या तर कधी पुसलेला फळा,
मन कधी आनंदी पहाट तर कधी नुसतेच गोल फिरणारे चर्हाट !!

मन कधी घेते उंच भरारी, तर कधी कोपर्‍यात दडी मारी,
मन कधी होई बावरे तर कधी दाखवते मार्ग खरे !!

मन कधी आठवणींचा खजिना तर कधी उडालेल्या पक्षाचा पिंजरा,
मन कधी असे तर कधी तसे पण असते ते आपले से आणि जवळचे,
मग छोट्याशा चुकना त्याच्या नाही का माफ करायचे...

Mazi kavita


ढग

मेघ दाटून आले वारा सोसाट होता,

फुले हसली मुले नाचत आली,

पाउस गाणी घुमू लागली,

झुले ही सजले खेळ रंगले.


वारा वाहत आला आणि मधेच थबकाला,

या धान्दलीत एक ढग हरवला वाट चुकला,

मित्रान समवे रमत चालला तो धुंदीत निघालेला,

वार्या ने दगा दिला आणि बिचारा मगेच राहिला.


ढग म्हणाला येतो फिरून आजूबाजूचा परिसर येतो जरा पाहून,

जरा बागडून येऊ परत मित्रा कडे असा विचार केला,

एकटाच फिरला नभात बागडला, परत फिराया पहिले वळून दूर पर्यंत पण कुणीच दिसेना.


एकटाच तो दिषाहीन झाला कुठे जावे काहीच कळेना,

मित्र सुटले सोबती ही गेले, सर्वत्र चाचपडले पण कुणीच गवसेना.


एकला कासावीस तो कावरा बावरा निघाला,

आता फक्त आठवणीच राहिल्या जसा फुलांचा गंधच उडाला,

नाही कुणी त्याला पुसायला एकलाच तो पुढे सरला,

धो धो रडला आणि सावळ्याचा शुभ्र झाला.


कुणी अपुले उरले कुणी सखे सोयरे,

उसासे टाकत तो एकलाच पुढे सरला,

हताश आणि जिर्ण तो ना त्यात त्राण उरला,

गरगरत्या वार्या मधे अडकून तो नभात विरला............

- कवी सर्वेश